Thursday, 18 January 2018

|| निसर्ग संपत्ती योगदान -2।।



एकूण पंच महाभूतातून पंच तत्वे विकसित होतात जमिनीतून फळे फुले धान्य निर्मिती होऊन मानवाचे भरणं पोषण होत असते. मानवाचे ५ तत्वे म्हणजे -तिखट , गोड़. आंबट . कडू .तुरट . ह्या पासून मानवी शरीरातील रासायनिक दृष्टीने पोषण होते त्यामुळे मानवी हाडे .मज्जातंतू .स्नायू .बळकट व विकसित होतात .

ह्या पंच महाभूतातील पाच तत्वांपैकी एक तत्व जरी बिघडले तरी मानवी शरीराचे त`संतुलन बिघडते मानव आजारी पडतो व ह्या पंचतत्वांचे संतुलन फक्त निसर्ग करू शकतो . ह्या ५ तत्वांचे योग्य प्रमाण मानवी शरीराला आवश्यक आहे . 

ह्या संदर्भात आपल्याला पंचकुर आहाराची कल्पना देता येइल .निसर्गातील पाच तत्त्वापासून मिळणार आहार म्हणजे पंचकुर आहार होय डॉक्टर आपल्याला आहारामध्ये कडधान्ये .उसळी व पालेभाज्या घेण्यास सांगतात कारण हरभरा ,हिरवे वाटणे ,शेंगदाणे .मटकी ,मूग .चवळी  ह्या पाच मध्ये पंचाम्हाभूतांतील तत्वांचा समावेश होतो . आपल्या पालेभाज्यांमध्ये मानवी गंभीर आजारावर पण उपाय आहेत .भाज्यांमध्ये कारले .मेथी .ह्या अत्यंत कडवट भाज्यांमध्ये मधुमेह . कंट्रोल होतो . आजारी पडलेल्या  व्यक्तीला शरीरासाठी संत्री. मोसंबी. व इतर फळांचा रस दिला जातो. ह्या फळांच्या रसामुळे आजारी व्यक्तीचे रक्त शुद्ध होते केवळ हलका भात व फळे सेवन करून आजारी व्यक्ती चे आरोग्य चांगले राहते. 

निसर्ग आपल्याला चौफेर आहार देतोच देतो त्याचप्रमाणे आपल्याला .तुळस. हळद. गूळ . कोरफड . कारले .मेथी कोथिंबीर व अन्य ह्या द्वारे मिळणाऱ्या औषधी तत्वामुळे शरीरात केमिकल प्रक्रिया होऊन शरीर तंदुरुस्त  होण्यास मदत हि होते . 

निसर्गातील विज्ञान व  औषधी तत्वे समजण्यासाठी त्यातील आहारतज्ज्ञ आपण कोणत्यावेळी ,कोणत्या वातावरणात काय आहार घ्यावा ह्याचे निसर्ग घटकांचा अभ्यास करून त्या त्या आजारी .व निरोगी व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन करतात .

परंतु भारतात अजूनही आहाराच्या बाबतीत मोट्या प्रमाणावर मतभेद आहेत ,

जागतिक आहार तज्ज्ञांच्या  मतानुसार शाकाहारी आहाराबद्दल दुमत आहे. बरेच लोकं मांसाहाराशिवाय पर्याय नाही असे म्हणतात . त्यांच्या मतानुसार मांसाहारामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने व जीवनसत्वे असतात ,असे म्हणणारा एक मोठा वर्ग आहे, ह्या एकूण शाकाहार व मांसाहार ह्या वादावरून आपण काय खावे व काय खाऊ नये ह्याबाबत जनतेला पूर्ण माहिती व ज्ञान नाही .असे सिद्ध होते . ह्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे दोन्ही आहार घेऊन सुद्धा सर्व-



No comments:

Post a Comment